सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जनतेने निवडणूक हाती घेतली ही बजरंग सोनवणे यांच्या विजयाची नांदी - आमदार जयंत पाटील

निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हाती घेतल्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे नांदी दिसून येत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

Shruti Patil
  • May 7 2024 7:43AM
आष्टी: मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी मी आलो होतो त्यावेळी वेगळी परिस्थिती होती आणि यावेळी वेगळी परिस्थिती आहे निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हाती घेतल्यामुळे बजरंग सोनवणे यांच्या विजयाचे नांदी दिसून येत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तर बीड जिल्हा च्या उमेदवारासाठी देशाच्या पंतप्रधानांना बीड येथे यावे लागत आहे त्यामुळे जिल्ह्यात कितीही हेलिकॉप्टर लँड झाले तरी लोकसभेत विजयी होऊन दिल्लीचे विमान बजरंग सोनवणे पकडणार आहेत असे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले आष्टी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
 
या सभेसाठी राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार येणार होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना येता आले नाही गेल्या 22 दिवसात त्यांनी 50 सभा केल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या केंद्र शासनाने इलेक्ट्रॉल बोंड मध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला असून शिरूर लोकसभेप्रमाणेच बीडमध्ये देखील स्वाभिमानाची लढाई सुरू आहे असे सांगितले यावेळी बोलताना बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले की बीड जिल्ह्यातील बाराशे गावापैकी 600 गावातील दौरा पूर्ण झाला असून सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतले असून मी शेतकरी पुत्र असल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे परंतु मी गरीब जरी असलो तरी दोन कारखाने यशस्वीरित्या चालवून दाखवत आहे तुम्ही विरोधा वर्षात किती विकास कामे केली यावर बोलले पाहिजे हे सोडून पालकमंत्री आणि उमेदवार हे माझ्या वैयक्तिक नावाने टीका करत आहेत हे चांगले नाही शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान असून माझे प्रारब्ध काय आहे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून येईल असे सांगितले.
 
यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी अत्यंत आक्रमकपणे बोलताना सांगितले की आष्टीचे तिन्ही आमदार मी केले असून त्यांची भाषा बरोबर नाही ते काय उद्गार काढतात त्यांची लायकी नाही कितीही दमबाजी केली तरी तरुण वर्ग आमच्याबरोबर असल्यामुळे त्यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाही मागील निवडणुकीत आमच्या काही चुका झाल्यामुळे बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला परंतु आता परळीतून बबन गीतेंसारखे नेते असल्यामुळे यावेळी काही अडचण येणार नाही असे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार