सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

लग्न म्हणजे 'गाणे आणि नृत्य' आणि 'पिणे आणि जेवण' किंवा अनावश्यक दबाव आणून हुंडा आणि भेटवस्तू मागण्या आणि देवाण-घेवाण करण्याचा प्रसंग नाही. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत फौजदारी कारवाई केली जाऊ शकते.

Shruti Patil
  • May 2 2024 8:57AM

नवी दिल्ली: हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच - गाण्यांचा, जेवणाचा किंवा दारू पिण्याचा कार्यक्रम नाही, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने, सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह मान्य नाही. नोंदणी केली, तरी हे विवाह वैध राहणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

 
हिंदू विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तसेच तरुणांनी विवाहाचा विचार करताना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा. अपेक्षित विधी न केल्यास हिंदू विवाह अमान्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विवाह वैध मानले जात नाहीत. हिंदू विवाह अधिनियम १९५५ अंतर्गत हिंदू विवाहाच्या कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रतेला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून अधोरेखित केले आहे.

 

विवाह हा एक व्यावसायिक व्यवहार नाही, हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी साजरा केला जातो, जो भविष्यात वाढत्या कुटुंबासाठी पती-पत्नीचा दर्जा प्राप्त करतो' अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार