हदगाव: हदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे, गुराढोरांचे, घरांचे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अजूनही प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज हदगांव येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा बैलगाडी मोर्चा जिल्हा परिषद हायस्कूल शाळेपासून बस स्टॅन्ड मार्गे हदगाव तहसीलवर धडकला, या मोर्चामध्ये आजूबाजूच्या खेड्यातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा स्वराज्य पक्षाचे नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी प्रशासनाला दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कांबळे व हदगाव तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिले. यावेळी मोर्चेकर्यांच्या मागण्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी कांबळे व हदगाव तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी मोर्चेक-यांना दिले.
- अरविंद जाधव...