रायगड: महाराष्ट्राचे धार्मिक स्थळ असलेल्या शिवथरघळईला जोडणाऱ्या पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता शिवथरघळ बसस्टॉप ते घळईच्या मुख्यद्वारा पर्यंत नव्याने बनवण्यात आला आहे. मात्र मे महिन्याच्या अखेरीस बनवण्यात आलेल्या रस्त्याला आतून घळई सदृश्य पोकळी निर्माण झाली असून त्या ठिकाणी समर्थ भक्तांचा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार की नाही? असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
महाड विधानसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी हजारोंचा निधी मंजूर करुन आणला आहे. मात्र ठेकेदार आणि अभियंते मिळून कोटींच्या कामाची माती करताना दिसत आहेत. या ठेकेदार आणि संभधित विभागाच्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत