कल्याण: जिहादी असलम मुल्ला आणि रेहान यांनी अखिल भारतीय गोरक्षा महासंघाचे संजय रामसंजीवन सुमन यांचे अपहरण केले. त्यानंतर दुर्गाडी जवळील एका तबेल्यात नेऊन बेदम मारहाण केली. गोमांस असलेला टेंपो पोलिसांना पकडून दिल्यावरून या धर्मांधांनी या गोरक्षाकाला मारहाण करून ‘‘पुन्हा गोमांस असलेला टेंपो पोलिसांना पकडून दिला, तर जिवंत गाडू’’, अशी धमकी दिली.
सुमन यांनी पूर्वी या धर्मांधाचा गोमांसाचा टेंपो पकडून दिल्यामुळे त्यांच्यावर अवैध गोमांस वाहतुकीवरून कारवाई केली होती. त्यानंतर सुटले आहेत. सुमन हे मूळचे उल्हासनगर येथील आहेत. गोरक्षण, तसेच गोवंशियांच्या मांसाची तस्करी होऊ नये; म्हणून गोरक्षा महासंघाचे कार्यकर्ते कार्य करतात. नॅशनल उर्दु हायस्कूल समोरील रस्त्यावरील गोविंदवाडी वळण रस्त्यावर धर्मांधांनी त्यांचे अपहरण केले.
मारहाण करून आरोपींनी सुमन यांना एका मोटारीतून पत्रीपूल भागात सोडून दिले. याविषयी सुमन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी हिंदु संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.