पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या डोंबिवलीमधील नागरिकांच्या कुटूंबाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतांना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल, असे सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.