सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगामजवळील एका पर्यटन केंद्रावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे.

Sudarshan MH
  • Apr 26 2025 7:50AM
पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले. यावेळी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्रातील अनेक लोकं पर्यटनासाठी तिथे गेले होते. या हल्ल्यात काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा बदला कधी घेतला जाईल याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, टाइट फॉर टॅट असे उत्तर कधी दिले जाईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जात आहे.
 
तसेच, जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन तेथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
भारत गप्प बसणार नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार