जामखेड: जामखेड तालुक्यात चंदन तस्करी होत आहे, अशी गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्याने वनविभागाने सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक बनवून चंदन साठा जप्त करत चंदन तस्करा विरोधात वन नियमावली नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन दिवसंची वन कस्टडी दिली आहे.
दिनांक १०/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा. मौजे जवळके ता. जामखेड या ठिकाणी चंदनाची तस्करीव चंदनाचा साठा असलेची गोपनिय माहिती मिळाल्याने उपवनसंरक्षक अहिल्यानगर धर्मवीर सालविठ्ठल साहेब (IFS) यांच्या मार्गशनाखाली सहा. वनसंरक्षक, राहुरी गणेश मिसाळ व वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन मारूती शेळके, वनपाल प्रविण उबाळे, वनरक्षक शांतीनाथ सपकाळ, रवि राठोड, नागेश तेलंगे,वनमजुर राघु सुरवसे, शिवाजी चिलघर यांनी कारवाई केली.
जवळके ता. जामखेड या ठिकाणी सदर घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गि-हाईक पाठवुन खातर जमा करण्यात आले सदर ठिकाणी काका वर्धमान वाळुंजकर चंदन तस्करी करत असल्याचे खात्री झाली. सदर ठिकाणी आरोपीसह ३५ गोण्या ढलप्या / सालपट, चंदना च्या गाभ्याचा १ तुकडा (वजन १.४ किलो), वाकास – ३, तराजु – १, विवो कंपनीचा मोबाईल व बजाज कंपनीची. मोटारसायकल असा मुद्येमाल ताब्यात घेतला आहे.
सदर प्रकरणी राऊंड गुन्हा क्र. ओ – ०४ / सन २०२४-२५भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२,५१,५२,६९ व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ नियम क्र.३१,५५ अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीस मा. ज्युडिशियल मॅजीस्ट्रेट प्रथम वर्ग – १ जामखेड ता-जामखेड यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची वनकस्टडी दिली आहे.