तिरुमला: आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने तेथील १८ अहिंदू कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम् च्या नियमांविरुद्ध काम केल्याविषयी या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सर्व १८ अहिंदू कर्मचार्यांसमोर दोन अटी ठेवल्या आहेत , एकतर त्यांनी दुसर्या सरकारी विभागात बदली घ्यावी किंवा स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावी.
मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान मंडळाने सांगितले. टीटीडीचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. टीटीडीमध्ये काम करूनही ते सर्वजण अहिंदु धार्मिक परंपरांचे पालन करत होते. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.