पुरातत्व विभागाकडील गड जतन करण्यासाठी राज्याकडे द्या; मंत्री आशिष शेलार यांची केंद्राला विनंती
आमच्या इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले जतन करणे आमचे कर्तव्य असून आमचे हे अभिमानाचे कार्य ठरू शकते, त्यामुळे हे किल्ले भारतीय पुरातत्व विभागाकडून महाराष्ट्र किल्ले हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आपण द्यावेत, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे.