कोल्हापूर: २०१७ मध्ये भुमिअभिलेख कडून झालेल्या सर्वे मध्ये व गावठाण मोजणीत मुळ गावठाणाची मोजणी करून गावातील 90 ते 95 टक्के लोक नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड सदरी नाव नोंद करून देण्यात आले पण कात्यायनी वसाहत मधील नागरिक किमान ५० वर्षे मूळ गावठाण क्षेत्रात घरे बांधून रहिवास करीत आहेत. असं असताना मात्र या वसाहती मधील जवळपास ६० ते ७० मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीस मालक सदरी महाराष्ट्र शासन असे नाव लावण्यात आले आहे. भोगवटदार सदरी त्यांचे नावाची नोंद केली आहे.
या नोंदी दुरुस्त करून मालक सदरी नाव दाखल करून प्रॉपर्टी कार्ड मिळावे. या आशयाचे निवेदन कात्यायनी वसाहत मधील नागरिकांकडून माजी आमदार चंद्रदिप नरके यांना देण्यात आले. या निवेदनावर कात्यायनी वसाहत मधील काही रहिवाशांच्या सह्या आहेत.