कळवण: कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचा संपर्क तुटल्याने बस व खाजगी वाहतूक देखील ठप्प झाली आहे, ज्यामुळे प्रवाशां, विध्यार्थीना , शेतकऱ्यांना,प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कळवण प्रशासनाकडून तातडीने मदतकार्यासाठी देखील कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत . अत्यावश्यक सेवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच, हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन कळवचे तहसीलदार रोहिदास वारोळे यांच्याकडून करण्यात आले आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनानेने केले आहे.
रवींद्र आहेर (कळवण)