सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा; मुस्लिमांकडून वक्फ कायद्यातील सुधारणांविरुद्ध करण्यात येणार्‍या हिंसक आंदोलनांवर डॉ. आनंद रंगनाथन् यांचे वक्तव्य

वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते.

Sudarshan MH
  • Mar 13 2025 11:45AM

दिल्ली: वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या. अशा काळ्या, अत्याचारी, अन्याय्यपूर्ण कायद्यांमध्ये पालट नको, तर ते रहितच केले गेले पाहिजेत. वक्फ कायद्यात पालट करू नका, तर तो रहितच करा, असे रोखठोक वक्तव्य प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत आणि वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् यांनी केले.

 
वैज्ञानिक डॉ. आनंद रंगनाथन् एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. ‘माझा वक्फ बोर्डाला विरोध नाही, तर त्याच्या कायद्याला आहे. असंख्य बोर्ड आणि स्वयंसेवी संस्था आहेत, तसाच वक्फ बोर्ड आहे’, असेही रंगनाथन् यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी बोलतांना डॉ. रंगनाथन् म्हणाले, की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला, तरी एखादी गोष्ट थांबवण्याचा अधिकार कुणालाही नाही. शाहीनबाग येथे झालेले आंदोलन आठवा. द्वेषपूर्ण धर्मांधांनी अवैधरित्या तेथील रस्ते रोखून लाखो लोकांची गैरसोय केली होती. त्यामागे त्यांच्याकडे कोणतेही तार्किक कारण नव्हते. केवळ शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी तसे केले आणि त्या वेळी घोषणा काय दिल्या, तर ‘तेरा-मेरा रिश्ता क्या ला-इलाला-इल्ललाह’ (केवळ अल्लाच देव आहे, अन्य कुणीही नाही); ‘हिन्दुओं से आजादी’, ‘काफिरों से आजादी’, ‘हम लेकर रहेंगे जिन्ना वाली आजादी’, ‘हिन्दुत्व की कबर खुदेगी’?
 
वक्फ कायद्यातील सुधारणांविरुद्ध मुसलमान हे शाहीनबागसारखे आंदोलन करण्याची धमकी देत आहेत; परंतु मी त्यांना दोष देणार नाही. मी यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनाच उत्तरदायी धरीन. पहिल्या वेळी (वर्ष २०२० मध्ये) ते शाहीनबागमधील आंदोलन थांबवण्यात अपयशी ठरले. आता जर ते पुन्हा अपयशी ठरले, तर आपण हे स्वीकारले पाहिजे की, आपण एक दुबळा देश आहोत, जो रस्त्यावर उतरलेल्या समुदायाच्या विरोधासमोर नमतो.
 
वर्ष २०२० मध्ये मुसलमानांनी तेलंगाणात झालेल्या आंदोलनात राष्ट्रध्वजातील अशोक चक्राच्या ठिकाणी ‘शहादा’ लिहिलेले आठवते का तुम्हाला ? (शहादा ही इस्लामी प्रतिज्ञा आहे, ज्यामध्ये केवळ अल्लावरच श्रद्धा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.) लहान मुलांनी ‘आम्ही मोदी आणि शहा यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारू’, असे म्हटल्याचे आठवते का तुम्हाला? 
 
वक्फ कायद्याच्या नावाखाली आधी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर, नंतर बिहारमधील एक संपूर्ण गाव, नंतर भारताची संसद, नंतर विजयपूर (कर्नाटक) येथील अनेक एकर क्षेत्र, कन्नूर येथील क्षेत्र, केरळमधील ख्रिस्त्यांची ४०० एकर भूमी, नंतर महाकुंभमेळ्यातील पवित्र भूमी, या सर्वांवर वक्फ बोर्डाने दावा केला. तो दिवस दूर नाही, जेव्हा पेशावरपासून प्लासीपर्यंत संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप ‘एक देश’ म्हणून वक्फच्या अधिपत्याखाली येईल. हे सर्व अत्यंत विचित्र आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार